Friday, July 6, 2012

शरी आणि प्रभा....

शरी...


प्रभा..




माझं प्रेम एकदा आजमवायला हव होतंस...

Khup juni ahe kavita.. sumwer in 2010....

असच काहीतरी.....

त्याने धावत याव वार्यासारख...
मला मिठीत घेऊन आकाशभर भरकटाव...
त्याने कोसळत याव पावसा सारख...
मला थेंब थेम्बाने चिंब भिजवून जाव...

 -------

ओठामधले  शब्द बिंदू नाणून पापण्यांच्या काठावर येऊन थांबतात...
भावनांच्या गुंत्यामध्ये श्वास अधिकच अडकतात....
तुला थांबवणार्या हातातलं बळही अचानक निघून जात....
तुझ्याच पायाशी मन नुसतंच घुटमळत राहत....
तू निघतो म्हटलास.. कि असंच काहीस होत....

--------
पाउस काय सांगतोय कधीतरी ऐकून बघ...
थेंबामधलं गुपित जरा उलगडून बघ...
तुझ्या साठीच धावत आलाय तो एवढ्या लांबून...
पापण्यांमध्ये साठवलस जिला तिचीच आठवण घेऊन..
डोळ्यातले तुझ्या भाव टिपण्यात तो चांगलाच
प्रवीण आहे...
म्हणूनच तर असा अवेळी आज न बोलावता आला आहे...

-------
आपलं रडण  जेव्हा  जवळच्या  माणसासाठी  Disuturbance बनत ...
टच्च  भरलेल्या डोळ्यातलं पाणीही  आपोआप  आटून  जात ....
कोरड्या  डोळ्यांनी  मग  नुसतच  एकटक त्याच्याकडे  बघत  रहायचं ...
विचारांचं उठलेलं वादळ आपल्याच  ओंजळीत  बंद करून ठेवायचं...
खूप  खूप  आतून  दाटून  येतो  मग  एखादा  हुंदका .... रडून  घ्याव  त्याच्यासोबत  थोडस..
उद्या  पुन्हा  हसायचच  आहे .. मनाला  पुन्हा  एकदा  समजवावं  थोडस...

--------

जेव्हा  मनात  आठवणींचा  कडकडाट  होतो ...
तेव्हा  विचारांचा  पाऊस  पडतो ..
आणि  मग  त्यातल्याच  काही  धारा ...डोळ्यातून  बाहेर  पडतात ...
पापण्यांचा  बांध  ओलांडून  हळूच  गालावर  ओघळतात
आणि  मन  हलकं  करून  जातात ...
कदाचित  त्यालाच  अश्रू  असे  म्हणतात ..

--------

शिल्पा