Monday, October 21, 2013

झालीये म्हणे फाशी काल…

दिल्ली मध्ये काही महिन्यापूर्वी एक Gang rape ची केस झाली तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे… तिच्यासाठी आपल्यातला प्रत्येकजण जमेल तसा लढला… तिलाही नक्कीच बर वाटलं असणार हे पाहून… ती आज या जगात नाही पण तुम्ही तिचा लढा चालू ठेवला आणि शेवटी तिला न्याय मिळाला… तिला नक्कीच समाधान वाटलं असणार आहे याचं… तिचं दुखं कल्पनेच्या पलीकडलं आहे हे मला मान्य आहे… तरीही तिचं मन इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न… 
झालीये म्हणे फाशी काल…
त्या चार नराधमांना… 
दुसरी शिक्षा शोभलीच नसती…
माणुसकीच्या या राक्षसांना…

माणसातला हैवान त्या दिवशी…
मी उघड्या डोळ्यांनी पाहिला…
माणुसकीवरचा उरला-सुरला विश्वास…
अगदी त्याच क्षणी पार उडाला…

जीव तोडून विनवण्या केल्या…
अगदी पायासुधा पडून झाले…
पण त्या पाशवी वृत्तीपुढे…
माझे काहीच नाही चालले…

गिधाडांनी लचके तोडावे…
तशी माझ्या अब्रूची लक्तरं केली…
भरलं न्हवतं मन अजून…
म्हणून माझ्या शरीराचीही दुरावस्था केली…

माणसंच उभी होती समोर कि लांडगे…
माझं मलाच काही कळत न्हवतं…
एका बलात्काराच्या अपराधापायी…
माझं पुरतं आयुष्यच बरबाद झालं होतं…

समाधान एकाच गोष्टीचं…
तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिल्याचं…
आज मी जगात नसले तरी…
माझ्यासाठी तुम्ही सगळे लढल्याचं…

त्या न्यायदेवतेचेही आभार…
जीने योग्य तोच फैसला सुनावला…
सगळ्या प्रकाराने खचलेला माझा बाप…
लेकीच्या मरणानंतर पहिल्यांदाच सुखावला…

पण……. 
चारजण फासावर गेले म्हणून…
इथेच हे सगळं संपणार नाही…
मुळासकट उपटून टाकावंच लागेल…
हे इतक्या सहजासहजी वाढायचं थांबणार नाही…

रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येक मुलीला…
आज तुमचंच अभय हवंय… 
तिच्या प्रत्येक उंच भरारीला…
या समाजाचं पाठबळ हवंय…

आई, ताई, मैत्रीण… इथली प्रत्येक स्त्री… 
स्वतःच आयुष्य ताठ मानेने जगेल…
ती खऱ्या अर्थाने निर्भय होईल…
तीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली होईल…

- टिंग्याची आई

No comments:

Post a Comment