येतो येतो म्हणायचं आणि यायचंच नाही....
कितीही वाट पाहिली तरी याला फरकच पडत नाही....
त्याला हवं तेव्हा तो येणार... जणू त्याच्या मर्जीचा तो मालकच आहे....
दरवेळी वेडी आशा लावायची.... त्याची सवयच आहे...
परवा वाटलं आज नक्की येईल... अहो कोपऱ्यावर दिसला...
अन हट्टानं बघा कसा तिकडच्या तिकडे मागे फिरला....
कुणास ठाऊक कुठे गेलाय... मन अजूनही त्याच्या मागेच आहे....
मुद्दाम माझं मन मोडायची.... त्याची सवयच आहे....
डोळ्यांत पाणी दाटलं तरी हा दर्शन काही देत नाही...
कित्ती निरोप धाडले तरी... तो काही धावून येत नाही...
का बर रुसलाय आमच्यावर... ठाऊक त्याचं त्यालाच आहे...
उगा रुसवा धरायची... त्याची सवयच आहे....
ए म्हटलं फक्त एकदाच... चिंब भिजवून जा सारा आसमंत....
तुझ्याविना निष्प्राण झालीये धरणी... तिला कर पुन्हा जिवंत....
किती केल्या विनवण्या... पण ओंजळ अजून कोरडीच आहे...
काय करावं या पावसाला... हि त्याची सवयच आहे....
कोरड्याच मातीची शपथ घातली तो परत यावा म्हणून...
प्रत्येक रोपटं वाट पाहतंय... पुन्हा नव्याने जगायचं म्हणून....
बघा... थेम्ब कसे धावत आले आहेत... कदाचित त्याने यायचं ठरवलंच आहे...
व्याकुळ जीवाला शांत करायची... त्याची गोड सवयच आहे...
उशिरा का होईना आलाय... मन मोकळं बरसतोय...
धरत्रीच्या कणाकणात... नव-चैतन्य जागवतोय.....
प्रत्येक थेंबात... एक नवी कविता तो रचत आहे....
शब्दांना चिंब भिजवण्याची.... अशी मधुर सवयच आहे....
त्या बेधुंद कोसळणाऱ्या पावसाची.... :)
- टिंग्याची आई
कितीही वाट पाहिली तरी याला फरकच पडत नाही....
त्याला हवं तेव्हा तो येणार... जणू त्याच्या मर्जीचा तो मालकच आहे....
दरवेळी वेडी आशा लावायची.... त्याची सवयच आहे...
परवा वाटलं आज नक्की येईल... अहो कोपऱ्यावर दिसला...
अन हट्टानं बघा कसा तिकडच्या तिकडे मागे फिरला....
कुणास ठाऊक कुठे गेलाय... मन अजूनही त्याच्या मागेच आहे....
मुद्दाम माझं मन मोडायची.... त्याची सवयच आहे....
डोळ्यांत पाणी दाटलं तरी हा दर्शन काही देत नाही...
कित्ती निरोप धाडले तरी... तो काही धावून येत नाही...
का बर रुसलाय आमच्यावर... ठाऊक त्याचं त्यालाच आहे...
उगा रुसवा धरायची... त्याची सवयच आहे....
ए म्हटलं फक्त एकदाच... चिंब भिजवून जा सारा आसमंत....
तुझ्याविना निष्प्राण झालीये धरणी... तिला कर पुन्हा जिवंत....
किती केल्या विनवण्या... पण ओंजळ अजून कोरडीच आहे...
काय करावं या पावसाला... हि त्याची सवयच आहे....
कोरड्याच मातीची शपथ घातली तो परत यावा म्हणून...
प्रत्येक रोपटं वाट पाहतंय... पुन्हा नव्याने जगायचं म्हणून....
बघा... थेम्ब कसे धावत आले आहेत... कदाचित त्याने यायचं ठरवलंच आहे...
व्याकुळ जीवाला शांत करायची... त्याची गोड सवयच आहे...
उशिरा का होईना आलाय... मन मोकळं बरसतोय...
धरत्रीच्या कणाकणात... नव-चैतन्य जागवतोय.....
प्रत्येक थेंबात... एक नवी कविता तो रचत आहे....
शब्दांना चिंब भिजवण्याची.... अशी मधुर सवयच आहे....
त्या बेधुंद कोसळणाऱ्या पावसाची.... :)
- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment