Thursday, January 29, 2015

तिळगुळ घ्या गोड गोड बोला….

थोडा उशीर झाला पोस्ट टाकायला… :) मकर संक्रांती दिवशी टाकयची होती पण वेळच नाही मिळाला… :) म्हणून आज वेळ मिळताच टाकली… गोड मानून घ्यावी… ;)
आजचा दिवस मकर संक्रांतीचा… एकमेकांशी गोड बोलण्याचा… नात्यांमधल प्रेम आणखी घट्ट करणारा… तिळगुळाच्या काटेरी स्पर्शाने नवी नाती जोडणारा… 
मकर संक्रांतीचा सण म्हटलं कि आठवते भोगीच्या दिवशीची शेंगसोल्याची भाजी आणि भाकरी… गल्लीतलं एकही घर न चुकवता सगळ्यांना भाजी-भाकरी पोचवायचं काम आम्हा मुलाचं असायचं… संक्रांतीच्या दिवशी मग मस्त पुरण-पोळी… आणि दुसऱ्या दिवशी झणझणीत किंक्रांत… ;) क्रम ठरलेला… 
सकाळी सकाळी संक्रांतीची पूजा करायची म्हणजेच बुन्डूकली पुजायची प्रथा… ती चुन्याने रंगवायची, त्यात भरायला भुईमुगाच्या शेंगा, ऊस, गाजर सगळ गोल करायचं… हि सगळी काम आम्ही आवडीने करायचो… फार मजा यायची तेव्हा… आणि संध्याकाळी तीळगुळाचा डब्बा घेऊन नटून थटून आख्ख्या कॉलनीत 'तिळगुळ घ्या गोड बोला' करत हिंडायचं काम तर सगळ्यात फेवरेट… :) मोठ्यांना तिळगुळ तर द्यायचेच पण त्यांच्या कडून परत मिळेपर्यंत तिथून हलायचं नाही असा आमचा नेम… :) आईचीही हळदी-कुंकवाची गडबड असायची… तिच्या कितीतरी मैत्रिणी घरी येत आणि आईही जात असे… घरी येईपर्यंत तिची ओटी वाण गोल करून जवळ जवळ फुल झालेली असायची… मग पुन्हा आमची धडपड आपल्यासाठी काही मिळतंय का पहायची… :) 
तर असा काहीसा हा सण साजरा करायचो आम्ही… पण आता खरंच यातलं काही राहिलंय का…???
आपण सगळे कामात आणि स्वतःच्याच आयुष्यात इतके बिझी झालोय कि गोड तर राहिलंच पण आपण साध बोलणं सुद्धा विसरलोय… flat सिस्टीम, नोकरी-व्यवसाय, मोबाईल, इंटरनेट या सगळ्यात आपण नको इतके गुंतून गेलोय… काय तर म्हणे आमच्याकडे इतका वेळच नाहीये… अगदी आपल्या शेजारी-पाजारी कोण राहतंय कि नाही हे सुद्धा ठाऊक नसत… रोज लिफ्ट मध्ये भेटणारी माणसं सुद्धा फक्त त्या बदलत्या आकड्यांकडेच लक्ष देतात… पण त्या ४ फुटाच्या जागेत उभ्या असलेल्या इतरांना साधा hi-hello (नमस्कार :) सुद्धा करत नाहीत… ऑफिसमध्येही अशीच काहीशी अवस्था… जिथे काही मोबदला असेल तिथेच फक्त आम्ही (गोड) बोलतो… नाहीतर साधी स्माईल देणं सुद्धा आम्हाला जड जातं…. नातेवाईकांना पण काही काम असल्यासच फोन किंवा गाठीभेटी होतात नाहीतर त्यांनाही watsapp किंवा facebook वरच भागवलं जातं… कधी काळच्या जिवलग मैत्रिणी देखील watsapp वर देखील hi-bye शिवाय फार काही बोलत नाहीत… 
जिथे आपलं बोलणच कमी झालंय तिथे हा संक्रांतीचा सण तरी कितपत यशस्वी ठरेल आपल्या तोंडून गोड बोलवायला… साजरा तरी कसा होणार आपल्या बिझी शेड्युल मधून… 
हल्ली भोगीची भाजी सुद्धा घरच्यांपुरतीच बनते आणि तीही available असतील तेवढ्याच भाज्यांची… संक्रांतीच्या पोळ्याही लिमिटेड आणि तिळगुळ सुद्धा… इन मीन २ घरात तिळगुळ वाटायला जाणे… :(
वाईट वाटतंय विचार करून कि आपण इतके संकुचित विचारांचे झालोय… खरंच वाईट वाटतंय… 
म्हणूनच आज ठरवलंय हा सोन्यासारखा दिवस साजरा करायचा गोड बोलायचं… आज ठरवलंय बोलायचं… :) काटेरी तिळगुळ देऊन प्रेमळ नात पुन्हा जोडायचं… भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मायेने बांधायचं… जुन्या प्रत्येक नात्याला पुन्हा एकदा प्रेमाने साद घालायची…. तिळगुळाच्या गोडीने मैत्रीची हरवलेली गोडी परत मिळवायची… आणि संध्याकाळी टिंग्याला हाताशी घेऊन सगळ्यांना तिळगुळ दयायचे आणि म्हणायचं… 
"तिळगुळ घ्या गोड गोड बोला….
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…"

या वर्षीच्या b'lated आणि पुढच्या वर्षीच्या in advance…. ;)

-टिंग्याची आई

No comments:

Post a Comment