Tuesday, July 14, 2015

तितक सोप न्हवत...

आमच्या शेजारी एक आजी राहतात... त्यांनी कधीतरी गप्पा मारता मारता सांगितलेली त्यांचीच गोष्ट माझ्या शब्दांत...
आजोबा तसे लवकरच देवघारी गेले आणि त्यांच्या माघारी आजी ने घर आणि स्वताला कसे सावरले, सांभाळले याचीच ही गोष्ट... 



सगळच अधांतरी टाकून.... "साहेब" आम्हाला सोडून गेले....
संसाराचे सारे ओझे.... एकटीच्या दुबळ्या खांद्यावर आले....
बाहेरच्या जगाचा
.... मला साधा गंध सुद्धा न्हवता....
साहेब असताना
.... कधी काही करायचा संबंधच आला न्हवता....
म्हणायचे "ते"ही शेवटी.... आता तुझ कस ग होणार....?
तुझ्या एकट्या खांद्याना
.... हे ओझ कस बर पेलावनार....?
खरच... तितक सोप न्हवत...
एकटीने हा एवढा मोठा डोलारा संभाळन
....
नाजूक पावलांनी.... ही काटेरी पाउलवाट चालन....


मोठीच असली तरी.... तीन मुल मला बिलगलेलि....
थोरल्या लेकाच्या जान्याने.... अजूनही होती पापणी भिजलेली.... 
धाकटीचा लग्न सोहळा.... अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेला....
अन मोठीच्या घरचा पाळणाही
.... होता नुकताच हाललेला....
साहेबांच्या प्रदीर्घ आजाराने
.... धीर आधीच खचला होता....
तीन लेकरांच्या या आईचा
.... आधार कायमचा हरवला होता....
तितक सोप न्हवत...
दुखाने काटोकाट भरलेल्या अंतकरणाने
.... लेकीची पाठवणी करण.... 
डोंगराएवढ्या मोठ्या दुखावर.... हसून पांघरूण घालण....


आपला म्हटलेला प्रत्येकजण.... दूर निघून जात होता....
ज्यांनी आधार द्यावा तो एक-न-एक हात
.... केव्हाच सुटून गेला होता....
जवळच्या म्हणणार्‍या सार्‍यांनीच
.... कायमची पाठ फिरवली.... 
माझी उनी-दूनी काढन्यातच.... आपल्या माणसांना गोडी वाटली....
मायेन आधार देणार अस
.... कुणीच आम्हाला उरल न्हवत.... 
रोज नव्याने येणार दुख.... काही केल्या सरत न्हवत.... 
तितक सोप न्हवत...
आपल्या माणसाशिवाय
.... आयुष्याची ही प्रदीर्घ वाटचाल करण.... 
मनावर असंख्य वार झेलत.... स्वताशीच एक न संपणार युद्ध करण....


दाग-दागिने, पैसा-अडका.. साहेब मागे अमाप संपत्ती ठेऊन गेले....
पण सोबत पाहिलेले
.... प्रत्येक स्वप्न मात्र अर्धवट राहीले....
मुलांचा आधार बनायच होत
.... मग अश्रूंना मीच राम राम केला....
भळभळणार्‍या जखमेला
.... जुन्या आठवणींचा लेप दिला....
त्याच आठवणींनी भरलेल घरकूल
.... मायेची सावली देत उभ आहे....
माघारी एकट्या पडलेल्या माझ्यासाठी
.... पाठीरखा बनून उभ आहे....
तितक सोप न्हवत...
आपल्या घराला सावरण्यासाठी
.... स्वता घराबाहेर पाउल टाकन.... 
स्वताच अस्तित्व सिद्ध करायला.... या जगाशी चार हात करण....


इतकी वर्ष झाली.... बराच काळ लोटला....
दुखाचे दिवस सरुन
.... आता सुखाचा काळ आला....
पोरी-बाळी, लेकी-सुना... सगळे सुखाने नांदत आहेत
....
त्याच जुन्या घरकुलात
.... तुमच्या आठवणी जपत आहेत.... 
थकले आहे मीही.... आता फक्त विश्रांती घेते आहे....
लेकरांच्या सुख-समृद्धीची
.... ईश्वरचरणी प्रार्थना करते आहे....
पण खर सांगायच तर
....
तितक सोप न्हवत
....
तुमच्याविणा.... अस एकटीने आयुष्य जगण.... 
अन् तुमच्या आधाराशिवाय.... यातली प्रत्येक जबाबदारी पेलण....
- टिंग्याची आई
आजी खास तुमच्यासाठी... तुमचेच शब्द... माझ्या लेखणीतून.... :)

No comments:

Post a Comment