"तू म्हातारी व्हायचं नाही हं आजीबात…."
इतका वेळ कशाततरी मग्न असलेला माझा टिंग्या अचानक मला म्हणाला… ऐकून तशी चमकलेच मी पण म्हटलं ठीक आहे करूया थोडीशी गम्मत लेकाची आपल्या… ;)
मी विचारलं… "का रे बाबा…?"
"नाही म्हणजे नाही… मला नाही आवडत तू म्हातारी झालेलं…" अगदी चिडून बिडून उत्तर दिलं त्याने…
मग मी आपला नेहमीचा समजवायचा सूर धरत म्हटलं… "अरे बाळा…. सगळेच म्हातारे होतात… मी आधी तुझ्यासारखी लहान होते मग आता मोठी झाले आणि हळू हळू म्हातारी होणार… बाबा, मी सगळेच म्हातारे होणार…"
"मग आजी आणि आजोबा…???" टिंग्याचा पुढचा प्रश्न…
"ते आणखीन म्हातारे होणार… " आणखी एक उत्तर… :)
"कुणीही झालं तरी चालेल पण तू म्हातारी व्हायचं नाही म्हणजे नाही…." टिंग्या आता केविलवाण्या स्वरात बोलत होता….
त्याला जवळ घेत मी पुन्हा विचारलं…. "का रे बाळा… मी का बर व्हायचं नाही म्हातारी….??"
त्या निरागस जीवाचं उत्तरही अगदी त्याच्या इतकंच निरागस होतं… रडवेल्या स्वरात टिंग्या म्हणाला… "मग…. मी जर पडलो…. धडपडलो…. माझा पाय अडखळला… तर… मला कोण सांभाळणार………?????"
काय उत्तर द्यावं क्षणभर मला सुचेनासं झालं… ते बोल ऐकून गलबलायला झालं…
त्या चिमुकल्या जीवाला कदाचित हे लक्षातच आल नसावं कि आई म्हातारी होईल तेव्हा तोही मोठा होणार आहे… अगदी बाबासारखा…
टिंग्याला उराशी घट्ट कवटाळत मी म्हणाले… "अरे बाळा… आई इथेच असेल तुझ्या जवळ कुठेही जाणार नाही… आणि तोवर तू पण छान मोठ्ठा होशील कि नाही बाबासारखा… मग स्वतःच सांभाळून चालशील… स्वतःच पडताना तोल सावरशील…."
आणखीनच कुशीत शिरत टिंग्या म्हणाला… "नाही हं… तरीही तू म्हातारी व्हायचं नाही… प्रॉमिस….????"
आता मात्र पंचाईत झाली ना राव…. मी कशी म्हणणार होते यावर … "पक्का प्रॉमिस…!!!" म्हणून विषय वळवला… ;) कात्रीतून पटकन सुटायची हि पद्धत फार सोपी आहे….
"अरे टिंग्या… माझे केस पांढरे झाले आणि मी म्हातारी झाले तर घेशील का रे मला तुझ्या घरात ??"
"हो तर… का नाही…. घेणार कि मी तुला घरात…. " सगळ विसरून आता स्वारी खुशीत बोलत होती…. चला निदान त्या विचारातून टिंग्याला बाहेर काढण्यात आई यशस्वी झाली… :) पण हो स्वतः दुसऱ्याच विचारात हरवून गेली…. नेहमीसारखी….
टिंग्याला सांगावंसं वाटत होतं… तू मोठा होशील… तुझ्या नव्या जगाच्या शोधात या आईला सोडून कुठेतरी भूर उडून जाशील… पंखात बळ आलं कि पाखरं भूर उडून जातात… नव्या क्षितिजांच्या शोधात… नवीन घरटं बांधायला… स्वतःच… मग मागे राहिलेल्या घरट्याच काय होत असेल याचं पिल्लांना भान राहातच नाही…. मुलं मोठी होतात पण आई-बाबा कधीच मोठे होत नाहीत…." :)
खरंतर आपण म्हातारे होईपर्यंत जिवंत राहणार कि नाही कोण जाणे पण तरीही आपलं प्लानिंग चालूच असतं… मला उगीचंच बरं वाटलं… म्हटलं निदान म्हातारपणी पोरगा घरात घेईन म्हणतोय… सध्या तेवढं पुरे… :)
परवा फेसबुक वर एक पोस्ट वाचली…. आपल्या बाबांना अनाथ कम वृद्धाश्रमात सोडायला आलेल्या मुलाची… त्या आश्रमाच्या मालकाशी बाबांना गप्पा मारताना पाहून त्याने विचारलं "तुमची जुनी ओळख आहे का?" आणि त्यावर त्या मालकाने त्या मुलाला निरुत्तर करणारं दिलेलं उत्तर…. "हो… ३० वर्षापूर्वीची ओळख… ३० वर्षापूर्वी ह्यांनी इथूनच एक मुलगा दत्तक घेतला होता…."
वाचून जीवाला चटका लागला… सत्य आहे हे आजकालच… एक विदारक सत्य… :(
पण खरंच आपले म्हातारे आई बाप आपल्याला इतके जड झाले आहेत का?
ज्यांनी पहिलं पाऊल टाकायला आपल्याला आधार दिला त्यांच्या अखेरच्या प्रवासात आपण सरळ सरळ त्यांना निराधार करायचं हा कुठला न्याय…?
हल्ली आम्हा वर्किंग लोकांना फारतर गरज आहे म्हणून या म्हाताऱ्या आई-बाबाला so called आमच्या घरात जागा मिळते… आमची मुलं लहान आहेत तोवरच त्यांना सांभाळायला आम्हाला आजी-आजोबा हवे असतात… म्हणजे आम्ही निर्धास्तपणे ऑफिसची काम करायला रिकामे अगदी पार्ट्या सुद्धा…. आणि हो काही चुकलंच त्यांचं तर मनसोक्त ओरडायलाही माही मोकळे….
एकदा का आमची मुलं मोठी झाली म्हणजे फारतर फुल टाईम शाळेला जायला लागली कि मग मात्र आम्हाला या म्हातार्यांची अडचण व्हायला लागते… ते बिचारे मात्र आपली आयुष्यभराची कमाई आम्हा लेकरांवर उधळून रिकाम्या हाताने फक्त आमच्या मायेचं मागणं मागतात आमच्या दारी लाचारपणे उभं राहून…. पण आम्हाला कुठ जमतंय तेवढं….!!! आपल्याच व्यापात नको इतके गुरफटलेले आम्ही… पुरवतोय न पैसा आजारपणाला मग आणखी काय हवंय…?? पण फक्त पैसा पुरवला कि सगळ संपतं का? रोज नव्याने येणाऱ्या त्यांच्या दुखण्यांना अंत नसेलही पण तुम्ही आपुलकीने केलेली चौकशी सुद्धा पुरेशी असते त्या बिचाऱ्यांना…
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं असं म्हणतात…. मग आपण त्यांचे आईबाप व्हायचं सोडून साधी उसनी माया सुद्धा त्यांच्या पदरात घालू शकत नाही….????? अरे ज्यांच्याकडे हे मायेचं छत नाहीये ना त्यांना विचारा आईबापाची किंमत….
जिने नऊ महिने स्वतःच्या उदरात आपल्याला वाढवलं… तिला आपण साधं नऊ तासही सहन करू शकत नाही…!!!
ज्यांनी स्वतःच्या मजबूत खांद्यांवर आपलं ओझं आयुष्यभर वाहिलं… त्या खांद्यांना आपण साधा आधारही देऊ शकत नाही…!!!
जिने डोळ्यात तेल घालून आपली काळजी घेतली… ती आई आपल्याला डोळ्यासमोरही नको झाली आहे…!!!
ज्यांनी आजारपणात आपल्यासाठी रात्री जागून काढल्या… त्यांच्याच आजारपणात आपण मात्र फक्त पैसा पुरवून हात वर करतोय…!!!
जिने हाताचा पाळणा करून आपल्याला वाढवलं… त्या आईच्या थरथरत्या हातात हात द्यायलाही आपल्याकडे वेळ नाहीये…!!!
ज्यांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर न थकता काम केलं… त्या बाबांच्या थकलेल्या पावलांची आपण चार क्षण सुद्धा सोबत करू शकत नाही…!!!
ज्या आई-बाबाने पोरांच्या सुखातच आपला संसार धन्य झाला असं मानलं… त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांना नव्याने संसार थाटायला मजबूर करतोय…!!!
ज्यांनी आपल्याला समृद्ध आयुष्याची वाट चालायला मदत केली… आज आपण त्यांची सोन्यासारखी मुलंच त्यांना थेट वृद्धाश्रमाची वाट दाखवतोय…!!!
हल्लीच नाना पाटेकर यांचा नटसम्राट सिनेमा पाहिला…. पोरांना जड झालेल्या म्हाताऱ्या आईबापाची अन त्यांच्या स्वाभिमानाची करुण कथा किंवा व्यथा म्हणावी… बघताना माझ्याही डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होतं… नानांचा एक एक शब्द जिव्हारी बसत होता… पण प्रत्यक्षात असं काही वागणाऱ्यांना खरंच फरक पडला असेल…????
का झाली आहेत आपली मनं इतकी खुरटी…? कशाचाच फरक पडत नाही आपल्याला… धड आपल्याला मनमोकळ रडताही येत नाही आणि हसताही येत नाही… गुरफटलोय आपण स्वतामध्येच नको इतके…. आणि नको इतका गुंता झालाय… स्वतःचाच… अरे जिथे आपण जन्मदात्या आईबापाचे होऊ शकलो नाही तिथे दुसऱ्या कुठल्या नात्याचे कसं काय होऊ शकणार…?
असं म्हणतात कि सगळ्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात…. मग तुमची मुलही आहेतच कि… होतील तीही मोठी कधीतरी आणि मग कदाचित या सगळ्याचा हिशोब करतीलही…
पण खरं सांगू… मला वाटतं… आईबापाला असं वाऱ्यावर टाकणार्यांच्या बाबतीत असं होऊ नये…. हो… नकोच व्हायला… कारण त्यांच्यामध्ये एवढं मोठं दुखं सहन करायची कुवतच नाहीये… ज्यांचे डोळे आईच्या वेदनेने पाझरत नाहीत ती मानाने कमजोरच असली पाहिजेत… कदाचित त्यांच्या मुलांनी त्यांना म्हातारपणी प्रेमाने वागवलं तर त्यांना आपली चूक तरी कळेल… भले ती चूक सुधारता येणार नाही….
याउलट….
आजच सकाळ मध्ये एक लेख वाचला…. ज्यामध्ये स्वतः एक वृद्धा आपल्या वृद्धसदनातील वास्तव्याबद्दल सांगत होत्या… हो वृद्ध सदन… त्यांनी मुद्दामच आश्रम असा उल्लेख टाळलाय… वृद्धसदन किंवा ओल्ड एज होम्स मध्ये तिथले वृद्ध स्वतःच्या मर्जीने वास्तव्य करतात… त्यांना उपयोगी किंवा गरज असणाऱ्या सगळ्या सोई इथे छान उपलब्द्ध करून दिल्या जातात… सोबत १-२ डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय सुद्धा असतात… गरज पडल्यास अम्बुलन्स सुद्धा हजर असते दारात…
घरी हे आजी-आजोबा दिवसभर एकटे असताना काही मेडिकल इमर्जन्सी आलीच तर खरंच आपण वेळेवर पोहचू कि नाही हेही आपल्याला सांगता येणं कठीणच आहे… मग वाटतं कि अशी वृद्धसदनं असणं गरजेचं आहे… हा झाला एक वेगळा विचार… पण आपल्या सोयीचा आहे म्हणून वेगळा विचार करणारेही लोक आहेतच कि… :)
फक्त इतकंच वाटतं… ज्या आई-बाबांनी आयुष्यातल्या प्रत्येक वादळाला तोंड देत आपलं संरक्षण केलं त्यांना आयुष्यातल्या शेवटच्या अंकात असं वाऱ्यावर सोडू नका….
असो….
माझं हे असंच होतं… एका विचारातून कधी दुसऱ्या विचारात गुंतत जाते माझं मलाच कळत नाही… :)
सध्या मी ह्याच आनंदात आहे कि म्हातारपणी माझं पोरगं मला घरात घेणार म्हणतंय…
टिंग्या अजूनही सांगतो मला अधून मधून अगदी रोज… "तू म्हातारी नाही व्हायचं…"
आणि मीही मग खुश होऊन म्हणते…. "अरे बाळा…. अभी तो मैं जवान हुं……!!!" :)
- टिंग्याची आई
इतका वेळ कशाततरी मग्न असलेला माझा टिंग्या अचानक मला म्हणाला… ऐकून तशी चमकलेच मी पण म्हटलं ठीक आहे करूया थोडीशी गम्मत लेकाची आपल्या… ;)
मी विचारलं… "का रे बाबा…?"
"नाही म्हणजे नाही… मला नाही आवडत तू म्हातारी झालेलं…" अगदी चिडून बिडून उत्तर दिलं त्याने…
मग मी आपला नेहमीचा समजवायचा सूर धरत म्हटलं… "अरे बाळा…. सगळेच म्हातारे होतात… मी आधी तुझ्यासारखी लहान होते मग आता मोठी झाले आणि हळू हळू म्हातारी होणार… बाबा, मी सगळेच म्हातारे होणार…"
"मग आजी आणि आजोबा…???" टिंग्याचा पुढचा प्रश्न…
"ते आणखीन म्हातारे होणार… " आणखी एक उत्तर… :)
"कुणीही झालं तरी चालेल पण तू म्हातारी व्हायचं नाही म्हणजे नाही…." टिंग्या आता केविलवाण्या स्वरात बोलत होता….
त्याला जवळ घेत मी पुन्हा विचारलं…. "का रे बाळा… मी का बर व्हायचं नाही म्हातारी….??"
त्या निरागस जीवाचं उत्तरही अगदी त्याच्या इतकंच निरागस होतं… रडवेल्या स्वरात टिंग्या म्हणाला… "मग…. मी जर पडलो…. धडपडलो…. माझा पाय अडखळला… तर… मला कोण सांभाळणार………?????"
काय उत्तर द्यावं क्षणभर मला सुचेनासं झालं… ते बोल ऐकून गलबलायला झालं…
त्या चिमुकल्या जीवाला कदाचित हे लक्षातच आल नसावं कि आई म्हातारी होईल तेव्हा तोही मोठा होणार आहे… अगदी बाबासारखा…
टिंग्याला उराशी घट्ट कवटाळत मी म्हणाले… "अरे बाळा… आई इथेच असेल तुझ्या जवळ कुठेही जाणार नाही… आणि तोवर तू पण छान मोठ्ठा होशील कि नाही बाबासारखा… मग स्वतःच सांभाळून चालशील… स्वतःच पडताना तोल सावरशील…."
आणखीनच कुशीत शिरत टिंग्या म्हणाला… "नाही हं… तरीही तू म्हातारी व्हायचं नाही… प्रॉमिस….????"
आता मात्र पंचाईत झाली ना राव…. मी कशी म्हणणार होते यावर … "पक्का प्रॉमिस…!!!" म्हणून विषय वळवला… ;) कात्रीतून पटकन सुटायची हि पद्धत फार सोपी आहे….
"अरे टिंग्या… माझे केस पांढरे झाले आणि मी म्हातारी झाले तर घेशील का रे मला तुझ्या घरात ??"
"हो तर… का नाही…. घेणार कि मी तुला घरात…. " सगळ विसरून आता स्वारी खुशीत बोलत होती…. चला निदान त्या विचारातून टिंग्याला बाहेर काढण्यात आई यशस्वी झाली… :) पण हो स्वतः दुसऱ्याच विचारात हरवून गेली…. नेहमीसारखी….
टिंग्याला सांगावंसं वाटत होतं… तू मोठा होशील… तुझ्या नव्या जगाच्या शोधात या आईला सोडून कुठेतरी भूर उडून जाशील… पंखात बळ आलं कि पाखरं भूर उडून जातात… नव्या क्षितिजांच्या शोधात… नवीन घरटं बांधायला… स्वतःच… मग मागे राहिलेल्या घरट्याच काय होत असेल याचं पिल्लांना भान राहातच नाही…. मुलं मोठी होतात पण आई-बाबा कधीच मोठे होत नाहीत…." :)
खरंतर आपण म्हातारे होईपर्यंत जिवंत राहणार कि नाही कोण जाणे पण तरीही आपलं प्लानिंग चालूच असतं… मला उगीचंच बरं वाटलं… म्हटलं निदान म्हातारपणी पोरगा घरात घेईन म्हणतोय… सध्या तेवढं पुरे… :)
परवा फेसबुक वर एक पोस्ट वाचली…. आपल्या बाबांना अनाथ कम वृद्धाश्रमात सोडायला आलेल्या मुलाची… त्या आश्रमाच्या मालकाशी बाबांना गप्पा मारताना पाहून त्याने विचारलं "तुमची जुनी ओळख आहे का?" आणि त्यावर त्या मालकाने त्या मुलाला निरुत्तर करणारं दिलेलं उत्तर…. "हो… ३० वर्षापूर्वीची ओळख… ३० वर्षापूर्वी ह्यांनी इथूनच एक मुलगा दत्तक घेतला होता…."
वाचून जीवाला चटका लागला… सत्य आहे हे आजकालच… एक विदारक सत्य… :(
पण खरंच आपले म्हातारे आई बाप आपल्याला इतके जड झाले आहेत का?
ज्यांनी पहिलं पाऊल टाकायला आपल्याला आधार दिला त्यांच्या अखेरच्या प्रवासात आपण सरळ सरळ त्यांना निराधार करायचं हा कुठला न्याय…?
हल्ली आम्हा वर्किंग लोकांना फारतर गरज आहे म्हणून या म्हाताऱ्या आई-बाबाला so called आमच्या घरात जागा मिळते… आमची मुलं लहान आहेत तोवरच त्यांना सांभाळायला आम्हाला आजी-आजोबा हवे असतात… म्हणजे आम्ही निर्धास्तपणे ऑफिसची काम करायला रिकामे अगदी पार्ट्या सुद्धा…. आणि हो काही चुकलंच त्यांचं तर मनसोक्त ओरडायलाही माही मोकळे….
एकदा का आमची मुलं मोठी झाली म्हणजे फारतर फुल टाईम शाळेला जायला लागली कि मग मात्र आम्हाला या म्हातार्यांची अडचण व्हायला लागते… ते बिचारे मात्र आपली आयुष्यभराची कमाई आम्हा लेकरांवर उधळून रिकाम्या हाताने फक्त आमच्या मायेचं मागणं मागतात आमच्या दारी लाचारपणे उभं राहून…. पण आम्हाला कुठ जमतंय तेवढं….!!! आपल्याच व्यापात नको इतके गुरफटलेले आम्ही… पुरवतोय न पैसा आजारपणाला मग आणखी काय हवंय…?? पण फक्त पैसा पुरवला कि सगळ संपतं का? रोज नव्याने येणाऱ्या त्यांच्या दुखण्यांना अंत नसेलही पण तुम्ही आपुलकीने केलेली चौकशी सुद्धा पुरेशी असते त्या बिचाऱ्यांना…
म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं असं म्हणतात…. मग आपण त्यांचे आईबाप व्हायचं सोडून साधी उसनी माया सुद्धा त्यांच्या पदरात घालू शकत नाही….????? अरे ज्यांच्याकडे हे मायेचं छत नाहीये ना त्यांना विचारा आईबापाची किंमत….
जिने नऊ महिने स्वतःच्या उदरात आपल्याला वाढवलं… तिला आपण साधं नऊ तासही सहन करू शकत नाही…!!!
ज्यांनी स्वतःच्या मजबूत खांद्यांवर आपलं ओझं आयुष्यभर वाहिलं… त्या खांद्यांना आपण साधा आधारही देऊ शकत नाही…!!!
जिने डोळ्यात तेल घालून आपली काळजी घेतली… ती आई आपल्याला डोळ्यासमोरही नको झाली आहे…!!!
ज्यांनी आजारपणात आपल्यासाठी रात्री जागून काढल्या… त्यांच्याच आजारपणात आपण मात्र फक्त पैसा पुरवून हात वर करतोय…!!!
जिने हाताचा पाळणा करून आपल्याला वाढवलं… त्या आईच्या थरथरत्या हातात हात द्यायलाही आपल्याकडे वेळ नाहीये…!!!
ज्यांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर न थकता काम केलं… त्या बाबांच्या थकलेल्या पावलांची आपण चार क्षण सुद्धा सोबत करू शकत नाही…!!!
ज्या आई-बाबाने पोरांच्या सुखातच आपला संसार धन्य झाला असं मानलं… त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांना नव्याने संसार थाटायला मजबूर करतोय…!!!
ज्यांनी आपल्याला समृद्ध आयुष्याची वाट चालायला मदत केली… आज आपण त्यांची सोन्यासारखी मुलंच त्यांना थेट वृद्धाश्रमाची वाट दाखवतोय…!!!
हल्लीच नाना पाटेकर यांचा नटसम्राट सिनेमा पाहिला…. पोरांना जड झालेल्या म्हाताऱ्या आईबापाची अन त्यांच्या स्वाभिमानाची करुण कथा किंवा व्यथा म्हणावी… बघताना माझ्याही डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होतं… नानांचा एक एक शब्द जिव्हारी बसत होता… पण प्रत्यक्षात असं काही वागणाऱ्यांना खरंच फरक पडला असेल…????
का झाली आहेत आपली मनं इतकी खुरटी…? कशाचाच फरक पडत नाही आपल्याला… धड आपल्याला मनमोकळ रडताही येत नाही आणि हसताही येत नाही… गुरफटलोय आपण स्वतामध्येच नको इतके…. आणि नको इतका गुंता झालाय… स्वतःचाच… अरे जिथे आपण जन्मदात्या आईबापाचे होऊ शकलो नाही तिथे दुसऱ्या कुठल्या नात्याचे कसं काय होऊ शकणार…?
असं म्हणतात कि सगळ्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात…. मग तुमची मुलही आहेतच कि… होतील तीही मोठी कधीतरी आणि मग कदाचित या सगळ्याचा हिशोब करतीलही…
पण खरं सांगू… मला वाटतं… आईबापाला असं वाऱ्यावर टाकणार्यांच्या बाबतीत असं होऊ नये…. हो… नकोच व्हायला… कारण त्यांच्यामध्ये एवढं मोठं दुखं सहन करायची कुवतच नाहीये… ज्यांचे डोळे आईच्या वेदनेने पाझरत नाहीत ती मानाने कमजोरच असली पाहिजेत… कदाचित त्यांच्या मुलांनी त्यांना म्हातारपणी प्रेमाने वागवलं तर त्यांना आपली चूक तरी कळेल… भले ती चूक सुधारता येणार नाही….
याउलट….
आजच सकाळ मध्ये एक लेख वाचला…. ज्यामध्ये स्वतः एक वृद्धा आपल्या वृद्धसदनातील वास्तव्याबद्दल सांगत होत्या… हो वृद्ध सदन… त्यांनी मुद्दामच आश्रम असा उल्लेख टाळलाय… वृद्धसदन किंवा ओल्ड एज होम्स मध्ये तिथले वृद्ध स्वतःच्या मर्जीने वास्तव्य करतात… त्यांना उपयोगी किंवा गरज असणाऱ्या सगळ्या सोई इथे छान उपलब्द्ध करून दिल्या जातात… सोबत १-२ डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय सुद्धा असतात… गरज पडल्यास अम्बुलन्स सुद्धा हजर असते दारात…
घरी हे आजी-आजोबा दिवसभर एकटे असताना काही मेडिकल इमर्जन्सी आलीच तर खरंच आपण वेळेवर पोहचू कि नाही हेही आपल्याला सांगता येणं कठीणच आहे… मग वाटतं कि अशी वृद्धसदनं असणं गरजेचं आहे… हा झाला एक वेगळा विचार… पण आपल्या सोयीचा आहे म्हणून वेगळा विचार करणारेही लोक आहेतच कि… :)
फक्त इतकंच वाटतं… ज्या आई-बाबांनी आयुष्यातल्या प्रत्येक वादळाला तोंड देत आपलं संरक्षण केलं त्यांना आयुष्यातल्या शेवटच्या अंकात असं वाऱ्यावर सोडू नका….
असो….
माझं हे असंच होतं… एका विचारातून कधी दुसऱ्या विचारात गुंतत जाते माझं मलाच कळत नाही… :)
सध्या मी ह्याच आनंदात आहे कि म्हातारपणी माझं पोरगं मला घरात घेणार म्हणतंय…
टिंग्या अजूनही सांगतो मला अधून मधून अगदी रोज… "तू म्हातारी नाही व्हायचं…"
आणि मीही मग खुश होऊन म्हणते…. "अरे बाळा…. अभी तो मैं जवान हुं……!!!" :)
- टिंग्याची आई



Kadak... Ek number... Khuskhushit... Shevatcha sentence tar bhannat...
ReplyDeleteOhh.... Finally u got time to read my blog... :)
ReplyDeleteVachlyabaddal khup khup abhar.... ani comment sathi pan dhanyawad.... :)