लास्ट विकेंडला माझ्या प्रिय मैत्रिणीला फार दिवसांनी भेटले… वेळ काढून तिच्या घरी गेले होते… मावशीला भेटून टिंग्या आणि मी दोघेही खुश झालो… धावती विझिट होती पण तरीही खूप बर वाटलं… जास्त गप्पा नाही मारता आल्या पण त्या भेटीने दोघींचाही पोट भरलं… समाधानाने दोघीही आपापल्या घरी परतलो… नेहमीची कामं झाली आणि रोजच्यासारख निवांत झोपी गेलो…. आणि रात्री मला एक स्वप्न पडलं…
एक अगदी जवळची मैत्रीण भेटली स्वप्नात…. थोडी काळजीत दिसत होती… मी भेटल्यावर थोडी खुलली… दोघींनीही घट्ट मिठी मारली… आणि या गोड भेटीचं सुख अश्रूंवाटे वाहू दिलं… या माझ्या मैत्रिणीलाही मी बरेच महिने कि बरेच वर्ष झाली भेटले नव्हते… आज संध्याकाळी एकीला भेटले म्हणून दुसरी मला स्वप्नात येउन भेटली… या दुसऱ्या मैत्रिणीचा विषयही झाला न्हवता आमच्या गप्पांमध्ये पण तरीही तिची 'आठवण' आली अगदी मनापासून आली…. म्हणूनच मग माझ्याही नकळत माझ्या मनाने खेळ मांडला आणि स्वप्नात भेट घडवून आणली आमची… :)
खूप खूप गप्पा झाल्या… घर-संसार… ऑफिस, पिल्लं अगदी सगळ्यांच्या… रात्र संपली तशी जाग आली आणि आमची भेटही तिथेच संपली… पाणावल्या डोळ्यांनी निरोप घेतला गेला… स्वप्न असलं तरी खऱ्याखुऱ्या भेटीसारखं गोंडस आणि लोभस होतं ते…
सकाळी उठून कामं आवरून पहिला त्या मैत्रिणीला फोन लावला… तीही बावरली असा सकाळी सकाळी आलेला फोन बघून… रात्रीच्या स्वप्नाचा सगळा वृतांत्त तिला सांगितला… आधी पोटभर हसून घेतलं आणि रात्रीच्या त्या भेटीचा आनंद जमेल तसा फोनवरच्या गप्पांमध्ये घेतला… आणि फोन ठेवताना जसा पाणावल्या डोळ्यांनी स्वप्नात घेतला तसाच काहीसा निरोप घेतला…
एका मैत्रिणीने ब्लॉगवर सांगितलेला आठवणींचा कप्पा डोळ्यासमोर उभा राहिला… जवळच्या-लांबच्या अगदी कोणाकोणाच्या आठवणींनी गच्च भरलेला… आवरवासा नाही वाटत… असाच भरलेला राहू देत सगळ्यांच्या आठवणींनी… :)
आज उगीचंच वाटत होतं….
आठवण… कधीही सांगून येत नाही…
कधी आणि कशी येईल… सांगता येत नाही…
कोणाच्याही नकळत हळूच येते…
कधी हसवून अन कधी पापण्या भिजवून जाते…
आठवण येते जिवाभावाच्या माणसांची…
आठवण करून देते सोनसळी क्षणांची…
आठवण… भावनांच्या असंख्य तारा छेडत येते…
भाबड्या मनाला आरपार भेदत जाते…
वाटतं…
आपल्यातल्या प्रत्येकाची… कोणीतरी अशीच आठवण काढत असेल…
हरवलेल्या कित्येक क्षणांची… गोळा-बेरीज करत असेल…
अशीच काही भेटीची स्वप्न… सगळ्यांनाच पडत असतील…
आणि बऱ्याचशा आठवणीतल्या भेटी… फक्त स्वप्नातच राहत असतील…
सकाळी सावरलेलं मन… पुन्हा त्याच भेटीची वाट पाहू लागतं…
अन रात्रीचं ते स्वप्न सुद्धा… दिवसाच्या लख्ख उजेडात कुठेतरी हरवून जातं…
अशीच मग कधीतरी… आठवणच आठवण करून देते…
जिवाभावाच्या माणसांच्या भेटीची… पुन्हा एकदा ओढ लागते… :)
एखाद्या व्यक्तीची आठवण आली म्हणजे आपण त्यांना विसरलो अस नाही…
आठवण येते म्हणजे आपण त्यांना विसरू शकत नाही इतकंच… :)
- टिंग्याची आई
एक अगदी जवळची मैत्रीण भेटली स्वप्नात…. थोडी काळजीत दिसत होती… मी भेटल्यावर थोडी खुलली… दोघींनीही घट्ट मिठी मारली… आणि या गोड भेटीचं सुख अश्रूंवाटे वाहू दिलं… या माझ्या मैत्रिणीलाही मी बरेच महिने कि बरेच वर्ष झाली भेटले नव्हते… आज संध्याकाळी एकीला भेटले म्हणून दुसरी मला स्वप्नात येउन भेटली… या दुसऱ्या मैत्रिणीचा विषयही झाला न्हवता आमच्या गप्पांमध्ये पण तरीही तिची 'आठवण' आली अगदी मनापासून आली…. म्हणूनच मग माझ्याही नकळत माझ्या मनाने खेळ मांडला आणि स्वप्नात भेट घडवून आणली आमची… :)
खूप खूप गप्पा झाल्या… घर-संसार… ऑफिस, पिल्लं अगदी सगळ्यांच्या… रात्र संपली तशी जाग आली आणि आमची भेटही तिथेच संपली… पाणावल्या डोळ्यांनी निरोप घेतला गेला… स्वप्न असलं तरी खऱ्याखुऱ्या भेटीसारखं गोंडस आणि लोभस होतं ते…
सकाळी उठून कामं आवरून पहिला त्या मैत्रिणीला फोन लावला… तीही बावरली असा सकाळी सकाळी आलेला फोन बघून… रात्रीच्या स्वप्नाचा सगळा वृतांत्त तिला सांगितला… आधी पोटभर हसून घेतलं आणि रात्रीच्या त्या भेटीचा आनंद जमेल तसा फोनवरच्या गप्पांमध्ये घेतला… आणि फोन ठेवताना जसा पाणावल्या डोळ्यांनी स्वप्नात घेतला तसाच काहीसा निरोप घेतला…
एका मैत्रिणीने ब्लॉगवर सांगितलेला आठवणींचा कप्पा डोळ्यासमोर उभा राहिला… जवळच्या-लांबच्या अगदी कोणाकोणाच्या आठवणींनी गच्च भरलेला… आवरवासा नाही वाटत… असाच भरलेला राहू देत सगळ्यांच्या आठवणींनी… :)
आज उगीचंच वाटत होतं….
आठवण… कधीही सांगून येत नाही…
कधी आणि कशी येईल… सांगता येत नाही…
कोणाच्याही नकळत हळूच येते…
कधी हसवून अन कधी पापण्या भिजवून जाते…
आठवण येते जिवाभावाच्या माणसांची…
आठवण करून देते सोनसळी क्षणांची…
आठवण… भावनांच्या असंख्य तारा छेडत येते…
भाबड्या मनाला आरपार भेदत जाते…
वाटतं…
आपल्यातल्या प्रत्येकाची… कोणीतरी अशीच आठवण काढत असेल…
हरवलेल्या कित्येक क्षणांची… गोळा-बेरीज करत असेल…
अशीच काही भेटीची स्वप्न… सगळ्यांनाच पडत असतील…
आणि बऱ्याचशा आठवणीतल्या भेटी… फक्त स्वप्नातच राहत असतील…
सकाळी सावरलेलं मन… पुन्हा त्याच भेटीची वाट पाहू लागतं…
अन रात्रीचं ते स्वप्न सुद्धा… दिवसाच्या लख्ख उजेडात कुठेतरी हरवून जातं…
अशीच मग कधीतरी… आठवणच आठवण करून देते…
जिवाभावाच्या माणसांच्या भेटीची… पुन्हा एकदा ओढ लागते… :)
एखाद्या व्यक्तीची आठवण आली म्हणजे आपण त्यांना विसरलो अस नाही…
आठवण येते म्हणजे आपण त्यांना विसरू शकत नाही इतकंच… :)
- टिंग्याची आई


अशीच कोणीतरी आठवण काढत असेल… :)
ReplyDeletekahi chukala kay re?
Deletetich ol update keli ahe... specific to Athavan not the person.. ;)
कोणीतरी अशीच आठवण काढत असेल… :)
chuk bhul mafi asavi... :) and thanks for the comment..
next time pan kalava kahi chukle aslyas.. ;)