आपल्या आयुष्यात खूप कमी लोक असतात जे आपल्यावर त्यांच्या विचारांचा, वागण्याचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडतात… देव आणि आई-बाबा यांच्यानंतर आपोआप जिथे आपण नतमस्तक होतो अशी एक व्यक्ती… माझ्या आयुष्यातल्या अशाच एका व्यक्तीबद्दल…
कदाचित तुमच्या आयुष्यातील 'त्या' व्यक्तीला भेटल्याच समाधान तुम्हाला मिळेल… :)
माझ्या ओळखीच्या एक आजी आहेत… खूपच शांत आणि समाधानी व्यक्तिमत्व आहे त्याचं… त्यांना पाहिलं कि एखाद्या विशाल समुद्रासारख्या वाटतात त्या आणि तरीही एखाद्या नदीसारख्या शांत आणि मंजुळ आवाजात आपल्याकडच अनुभवांचं दान माझ्यासारख्या दीनाला भरभरून देणाऱ्या…
खरतर मी आईच मानते त्यांना… एक आदर्श व्यक्तिमत्व काय असतं हे त्यांच्याकडे पाहून कळत…. आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला त्या धैर्याने सामोऱ्या गेल्या… पतीच्या माघारी मुलांना सांभाळल… त्यांच्यावर संस्कार केले…. त्यांना मार्गी लावलं… आणि आज उतरत्या वयात आजही तितक्याच समाधानाने आयुष्य जगत आहेत…त्यांच्याविषयी लिहिण्याएवढी माझी लेखणी कधीच मोठी होऊ शकणार नाही… तरीही हा छोटासा प्रयत्न… :)
आज त्यांची मुलं-मुली संसारात रमलेले आहेत… पण आजी हल्ली घरात एकट्याच असतात… सकाळी मावशी स्वैपाक करून जातात आणि दुपारी कमल मावशी झाडलोट करून निघतात… एवढ्या मोठ्या साऊलीत आजी अध्यात्माला जोडीला घेऊन शांत चित्ताने राहत आहेत… साऊली हे आजींच्या घराचं नाव आहे आणि तिथे गेल्यावर अगदी सावलीत विसावल्याचाच अनुभव मिळतो… :) मी जेव्हा जेव्हा गावी जाते तेव्हा हमखास त्यांना भेटायचा प्रयत्न करते… या भेटीचं जेवढं जमेल तेवढं समाधान ओंजळीत साठवते….
हल्ली आजींची त्यब्येत थोडी ठीक नसते… वयोमानानुसार शरीराच्या बर्याच तक्रारी येत आहेत… छोटी मोठी काही ऑपरेशन्स सुद्धा झाली आहेत… मुली जमेल तशी चौकशी करतात… कधी फोनवर तर कधी भेटून अगदी जमेल तशी… आम्ही त्यांचा मानस लेकिसुद्धा त्यांना अधून मधून फोन करून चौकशी करत असतो… ५-१० मिनिटांच्या संभाषणातून त्यांच्या अमृतमयी शब्द्लहरि अंगावर बरसतात आणि जगण्याची नवी उमेद जागवतात… नकळत डोळे भरून येतात आणि मन भारावून जातं… क्षणभर त्यांच्या पायावर डोकं टेकून यावंस वाटतं आणि तसा आभासही होतो… त्याचंच पोटभर समाधानही आपसूक मिळून जातं….
रखरखत्या उन्हातून चालताना अचानक एका घनदाट वटवृक्षाच्या साउलीत नदीच्या पाण्याचा नितळ गारवा पावलांना आणि अंतरंगाला सुखावून जावा असाच काहीसा असतो हा अनुभव माझ्यासाठी…
आजींची तब्येत ठीक नसते हे माहिती आहे त्यामुळे दर वेळी त्यांना फोन करताना जीवाला धाकधूक लागलेली असते… आपलं मन खरंच खूप वाईट असतं… कधी काय विचार करेल सांगता येत नाही… :(
असो… २-४ महिन्यातून एखादाच फोन होतो आमचा… पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी आजींच्या मोबाईलवर कॉल करते तेव्हा जीव वर खाली होत असतो…. दोन्ही हात जोडून मन देवाकडे पार्थना करत असतं… आजी फोन उचलू देत… त्या बऱ्या असू देत… मला त्यांच्याशी बोलायचं आहे… त्यांची काळजी घे… :) आणि १०-१५ रिंग्स नंतर का होईना आजी फोन उचलतात… तेव्हा त्यांचा 'Hello' हा शब्द ऐकताच मंदिरातल्या पवित्र घंटानाद ऐकल्यावर मिळणारं समाधान मिळतं…. मनातल्या मनात बाप्पाचे आभार मानून पुढच्या गप्पा होतात…. आणि मिळालेलं शब्दामृत पिऊन मी पुढे होते… पुन्हा फोन केल्यावर आजीशीच बोलायला मिळो हे साकडं माझ्या लाडक्या बाप्पाला घालून…
आजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी पार्थना…. :)
- टिंग्याची आई
Few of you might guess this great person.. :)
कदाचित तुमच्या आयुष्यातील 'त्या' व्यक्तीला भेटल्याच समाधान तुम्हाला मिळेल… :)
खरतर मी आईच मानते त्यांना… एक आदर्श व्यक्तिमत्व काय असतं हे त्यांच्याकडे पाहून कळत…. आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला त्या धैर्याने सामोऱ्या गेल्या… पतीच्या माघारी मुलांना सांभाळल… त्यांच्यावर संस्कार केले…. त्यांना मार्गी लावलं… आणि आज उतरत्या वयात आजही तितक्याच समाधानाने आयुष्य जगत आहेत…त्यांच्याविषयी लिहिण्याएवढी माझी लेखणी कधीच मोठी होऊ शकणार नाही… तरीही हा छोटासा प्रयत्न… :)
आज त्यांची मुलं-मुली संसारात रमलेले आहेत… पण आजी हल्ली घरात एकट्याच असतात… सकाळी मावशी स्वैपाक करून जातात आणि दुपारी कमल मावशी झाडलोट करून निघतात… एवढ्या मोठ्या साऊलीत आजी अध्यात्माला जोडीला घेऊन शांत चित्ताने राहत आहेत… साऊली हे आजींच्या घराचं नाव आहे आणि तिथे गेल्यावर अगदी सावलीत विसावल्याचाच अनुभव मिळतो… :) मी जेव्हा जेव्हा गावी जाते तेव्हा हमखास त्यांना भेटायचा प्रयत्न करते… या भेटीचं जेवढं जमेल तेवढं समाधान ओंजळीत साठवते….
हल्ली आजींची त्यब्येत थोडी ठीक नसते… वयोमानानुसार शरीराच्या बर्याच तक्रारी येत आहेत… छोटी मोठी काही ऑपरेशन्स सुद्धा झाली आहेत… मुली जमेल तशी चौकशी करतात… कधी फोनवर तर कधी भेटून अगदी जमेल तशी… आम्ही त्यांचा मानस लेकिसुद्धा त्यांना अधून मधून फोन करून चौकशी करत असतो… ५-१० मिनिटांच्या संभाषणातून त्यांच्या अमृतमयी शब्द्लहरि अंगावर बरसतात आणि जगण्याची नवी उमेद जागवतात… नकळत डोळे भरून येतात आणि मन भारावून जातं… क्षणभर त्यांच्या पायावर डोकं टेकून यावंस वाटतं आणि तसा आभासही होतो… त्याचंच पोटभर समाधानही आपसूक मिळून जातं….
रखरखत्या उन्हातून चालताना अचानक एका घनदाट वटवृक्षाच्या साउलीत नदीच्या पाण्याचा नितळ गारवा पावलांना आणि अंतरंगाला सुखावून जावा असाच काहीसा असतो हा अनुभव माझ्यासाठी…
आजींची तब्येत ठीक नसते हे माहिती आहे त्यामुळे दर वेळी त्यांना फोन करताना जीवाला धाकधूक लागलेली असते… आपलं मन खरंच खूप वाईट असतं… कधी काय विचार करेल सांगता येत नाही… :(
असो… २-४ महिन्यातून एखादाच फोन होतो आमचा… पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी आजींच्या मोबाईलवर कॉल करते तेव्हा जीव वर खाली होत असतो…. दोन्ही हात जोडून मन देवाकडे पार्थना करत असतं… आजी फोन उचलू देत… त्या बऱ्या असू देत… मला त्यांच्याशी बोलायचं आहे… त्यांची काळजी घे… :) आणि १०-१५ रिंग्स नंतर का होईना आजी फोन उचलतात… तेव्हा त्यांचा 'Hello' हा शब्द ऐकताच मंदिरातल्या पवित्र घंटानाद ऐकल्यावर मिळणारं समाधान मिळतं…. मनातल्या मनात बाप्पाचे आभार मानून पुढच्या गप्पा होतात…. आणि मिळालेलं शब्दामृत पिऊन मी पुढे होते… पुन्हा फोन केल्यावर आजीशीच बोलायला मिळो हे साकडं माझ्या लाडक्या बाप्पाला घालून…
आजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी पार्थना…. :)
- टिंग्याची आई
Few of you might guess this great person.. :)

No comments:
Post a Comment