मन… किती साधा सोपा… आणि सरळ शब्द आहे...
पण याला शब्दांत बांधणं... खूपच कठीण आहे...
अणू-रेणू इतकं सूक्ष्म... तर कधी ब्रह्मांडाहून मोठं होतं...
एका क्षणाला इथे सापडेल... तर दुसऱ्या क्षणी साता समुद्रापार पोचतं...
जगातल्या कोणत्या वस्तूशी... या मनाची तुलना करावी...?
अशीच एखादी गोष्ट... जिला मनाची आकृती म्हणावी...?
आज पाण्याकडे बघून... असेच काहीसे वाटले...
एक एक करत विचारांचे... मनात असंख्य तरंग उठले...
मन म्हणजे पाणी….
एका अशांत सागरासारखं... प्रत्येक क्षणाला उसळणारं...
विचारांच्या लाखो लाटांनी... शांत किनाऱ्याकडे झेपावणारं...
मन वाटे कधी नदीसारखं... अखंड वाहत राहणारं...
प्रवासात लागणाऱ्या गावांप्रमाणे... आयुष्यातली माणसं जोडणारं...
कधी वाटे स्वच्छंद झऱ्यासारखं... आनंदाचे तुषार उडवणारं...
प्रेमासाठी व्याकूळ झालेल्या... जीवांची तहान भागवणारं...
मन म्हणजे जणू धबधबा... उंचावरून खाली कोसळणारा...
आपल्या शुभ्र जलधारांनी... आयुष्याचं सौंदर्य वाढवणारा...
पण कधी वाटतं मन म्हणजे नाला... सगळी घाण वाहणारा...
चुकल्या-माकल्या असंख्य पापाचं... प्रायश्चित्त करणारा...
तर कधी वाटे मन म्हणजे एक डबकं... गढूळ विचार साचलेलं...
हळू हळू जमिनीत मुरून... नुसतंच चिखल म्हणून उरलेलं...
कधी कधी वाटतं डोहासारखं... खूप खूप खोल असणारं...
राग, द्वेष, मत्सर... या वासुकींना आश्रय देणारं...
मन म्हणजे मृगजळ... क्षणात नाहीसं होणारं...
न लाभलेल्या सुखांचा... खोटाच आभास निर्माण करणारं...
मन म्हणजे नुसता एक ऊगळ... नुकताच जमिनीतून बाहेर आलेला...
या विशाल जगाच्या पाठीवर... स्वतःचं अस्तित्व घडवायला निघालेला...
खरतरं मन म्हणजे पावसाचं पाणी... असंख्य धारांनी बरसणारं...
प्रत्येक थेंबात नवी आशा घेऊन... सुखाचा नवा अंकुर रुजवणारं...
पण असंही वाटतं...
मन म्हणजे आपल्याच डोळ्यातलं पाणी... उत्कट भावना व्यक्त करणारं...
सुखात असो वा दु:खात... आपली अखंड साथ देणारं...
कधी कुणाच्या आठवणीने... कंठामध्ये दाटणारं...
तर कधी कुणी भेटल्यावर... आनंद बनून डोळ्यांत साठणारं...
मन म्हणजे पाणी... कोणताही आकार ऊकार नसलेलं...
हृदय नावाच्या छोट्याशा खोलीत... कायमचं घर करून बसलेलं...
- टिंग्याची आई
पण याला शब्दांत बांधणं... खूपच कठीण आहे...
अणू-रेणू इतकं सूक्ष्म... तर कधी ब्रह्मांडाहून मोठं होतं...
एका क्षणाला इथे सापडेल... तर दुसऱ्या क्षणी साता समुद्रापार पोचतं...
जगातल्या कोणत्या वस्तूशी... या मनाची तुलना करावी...?
अशीच एखादी गोष्ट... जिला मनाची आकृती म्हणावी...?
आज पाण्याकडे बघून... असेच काहीसे वाटले...
एक एक करत विचारांचे... मनात असंख्य तरंग उठले...
मन म्हणजे पाणी….
एका अशांत सागरासारखं... प्रत्येक क्षणाला उसळणारं...
विचारांच्या लाखो लाटांनी... शांत किनाऱ्याकडे झेपावणारं...
मन वाटे कधी नदीसारखं... अखंड वाहत राहणारं...
प्रवासात लागणाऱ्या गावांप्रमाणे... आयुष्यातली माणसं जोडणारं...
कधी वाटे स्वच्छंद झऱ्यासारखं... आनंदाचे तुषार उडवणारं...
प्रेमासाठी व्याकूळ झालेल्या... जीवांची तहान भागवणारं...
मन म्हणजे जणू धबधबा... उंचावरून खाली कोसळणारा...
आपल्या शुभ्र जलधारांनी... आयुष्याचं सौंदर्य वाढवणारा...
पण कधी वाटतं मन म्हणजे नाला... सगळी घाण वाहणारा...
चुकल्या-माकल्या असंख्य पापाचं... प्रायश्चित्त करणारा...
तर कधी वाटे मन म्हणजे एक डबकं... गढूळ विचार साचलेलं...
हळू हळू जमिनीत मुरून... नुसतंच चिखल म्हणून उरलेलं...
कधी कधी वाटतं डोहासारखं... खूप खूप खोल असणारं...
राग, द्वेष, मत्सर... या वासुकींना आश्रय देणारं...
मन म्हणजे मृगजळ... क्षणात नाहीसं होणारं...
न लाभलेल्या सुखांचा... खोटाच आभास निर्माण करणारं...
मन म्हणजे नुसता एक ऊगळ... नुकताच जमिनीतून बाहेर आलेला...
या विशाल जगाच्या पाठीवर... स्वतःचं अस्तित्व घडवायला निघालेला...
खरतरं मन म्हणजे पावसाचं पाणी... असंख्य धारांनी बरसणारं...
प्रत्येक थेंबात नवी आशा घेऊन... सुखाचा नवा अंकुर रुजवणारं...
पण असंही वाटतं...
मन म्हणजे आपल्याच डोळ्यातलं पाणी... उत्कट भावना व्यक्त करणारं...
सुखात असो वा दु:खात... आपली अखंड साथ देणारं...
कधी कुणाच्या आठवणीने... कंठामध्ये दाटणारं...
तर कधी कुणी भेटल्यावर... आनंद बनून डोळ्यांत साठणारं...
मन म्हणजे पाणी... कोणताही आकार ऊकार नसलेलं...
हृदय नावाच्या छोट्याशा खोलीत... कायमचं घर करून बसलेलं...
- टिंग्याची आई














No comments:
Post a Comment