Friday, December 14, 2012

अर्थहीन.....


अशीच कधीतरी सांजवेळी...  बेधुंद रातराणी फुलते...
मनाच्या भेगाळलेल्या जमिनीत... तुझ्या आठवणींची सर बरसवून जाते....

---------------------

गळून गेलेली पान... कोणाच्या कशी लक्षात राहणार..
त्यांनी जागा सोडल्याशिवाय.. नवीन पालवी तरी कशी काय उमलणार..
माणसांचाही थोडफार असंच असतं..

---------------------

तुमची काहीही चूक नसताना.. जी माणस तुम्हाला शिक्षा करतात....
ती खूप जवळची असतात..
कारण...
त्यांना ठाऊक असतं... तुम्ही नक्की समजून घ्याल....

---------------------

हल्ली SMS ची सवय मोडलीये..
आणि तासनतास फोनवर गप्पा मारायचीही...
अग..
तू सोडून गेलीस त्याच दिवशी.. मोबाईल लाही राम राम केलाय.. :)

----------------------

प्रत्येक वेळी समजून घेणाऱ्या माणसालाही...
कधीतरी वाटतच असेल....
कोणीतरी मलाही समजून घ्यावं.. नाही का..??

---------------------

शिल्पा लिमकर

 

No comments:

Post a Comment