अशीच कधीतरी सांजवेळी... बेधुंद रातराणी फुलते...
मनाच्या भेगाळलेल्या जमिनीत... तुझ्या आठवणींची सर बरसवून जाते....
---------------------
गळून गेलेली पान... कोणाच्या कशी लक्षात राहणार..
त्यांनी जागा सोडल्याशिवाय.. नवीन पालवी तरी कशी काय उमलणार..
माणसांचाही थोडफार असंच असतं..
---------------------
तुमची काहीही चूक नसताना.. जी माणस तुम्हाला शिक्षा करतात....
ती खूप जवळची असतात..
कारण...
त्यांना ठाऊक असतं... तुम्ही नक्की समजून घ्याल....
---------------------
हल्ली SMS ची सवय मोडलीये..
आणि तासनतास फोनवर गप्पा मारायचीही...
अग..
तू सोडून गेलीस त्याच दिवशी.. मोबाईल लाही राम राम केलाय.. :)
----------------------
प्रत्येक वेळी समजून घेणाऱ्या माणसालाही...
कधीतरी वाटतच असेल....
कोणीतरी मलाही समजून घ्यावं.. नाही का..??
---------------------
शिल्पा लिमकर
No comments:
Post a Comment