कॉलेजमध्ये असताना दिवस कसे भरभर निघून जातात कळतच नाही… गप्पा, भांडण दंगा
आणि तितकंच मनापासून केलेलं प्रेम… निघताना दिलेली Promises वगैरे वगैरे…
आजही जेव्हा त्याला तिची आठवण येत असेल… किती सहज निरोप घेतला होता सगळ
पुन्हा एकदा आठवत असेल… तेव्हा असंच काहीसं तो म्हणत असेल… :)
सवय लागली होती ग… तुला रोज भेटायची…
तुझा हसरा चेहरा… निदान एकदा तरी पहायची…
तुझ्या निळ्या डोळ्यातला भाव… मला कधी कळायचा नाही…
पण तुझी भेट झाल्याशिवाय… दिवस काही केल्या सरायचा नाही…
"भेटले नाही म्हणून विसरणार नाही…" किती सहज म्हणून गेलीस…
कॉलेज संपून झाली आता ५ वर्ष…आजवर facebook वरच्या फोटोतच काय ती भेटलीस…
कट्ट्यावरच्या गप्पा आपल्या… कितीतरी विषयांवर रंगायच्या…
फोनवर बोलता बोलता… चक्क रात्री जागून निघायच्या…
कधी कडू कधी गोड… तर कधी नको इतकं भांडून घेतलं…
पार्किंग मध्ये बसल्या बसल्या… प्रत्येक टेन्शन सारखं वाटून घेतलं…
"रोज एकदातरी कॉल नक्की करेन…" किती सहज म्हणून गेलीस…
पण change झालेला नंबर द्यायची… तसदी सुद्धा घेतली नाहीस…
माझ्या प्रत्येक वाढदिवसाला... काही ना काही गिफ्ट दिलंस…
अन तुझ्यासाठी नेहमी माझ्याकडून काहीतरी लिहून घेतलंस…
तू दिलेलं गुलाबाचं फूल सुद्धा मी अजून मी अजून जपून ठेवलंय
कवितेलाही Inspired By म्हणून तुझंच नाव लिहिलंय
"सगळ्या आठवणी जपून ठेवेन…" किती सहज म्हणून गेलीस…
अन निघायच्या गडबडीत कवितांची ती वही माझ्याकडेच विसरलीस…
तू तिथे मी… अशीच काहीशी होती ग आपली जोडी…
कळलंच नाही कधी वाढत गेली या नात्यामधली गोडी…
तुला सोडून दुसरा कुठला… विचारच कधी केला नाही…
तुझ्याविना आयुष्य जगावं लागेल… तेव्हा कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही…
"निदान आता तरी शोध कोणी जोडीदार…" किती सहज म्हणून गेलीस…
तुला न कळलेलं माझं प्रेम… माझ्याच रिकाम्या ओंजळीत सांडून गेलीस…
सोबत जगलेले सगळे क्षण… दोघांनीही मनात जपून ठेवले…
जितके जमले तितके मीही… मुद्दाम कवितेत गोवले…
आजही आठवते मला… डोळ्यांत पाणी भरून उभी तू…
सांजवेळीच्या मंद प्रकाशात… थरथरलेल्या आवाजात निरोप घेणारी तू…
"विसरणार तर नाहीस ना मला?" किती सहज विचारून गेलीस…
आजही तसाच तू परत फिरायची वाट पाहतोय मी… अन तू मात्र माणसांच्या गर्दीत न जाणो कुठे हरवलीस…
~ Shilpa
सवय लागली होती ग… तुला रोज भेटायची…
तुझा हसरा चेहरा… निदान एकदा तरी पहायची…
तुझ्या निळ्या डोळ्यातला भाव… मला कधी कळायचा नाही…
पण तुझी भेट झाल्याशिवाय… दिवस काही केल्या सरायचा नाही…
"भेटले नाही म्हणून विसरणार नाही…" किती सहज म्हणून गेलीस…
कॉलेज संपून झाली आता ५ वर्ष…आजवर facebook वरच्या फोटोतच काय ती भेटलीस…
कट्ट्यावरच्या गप्पा आपल्या… कितीतरी विषयांवर रंगायच्या…
फोनवर बोलता बोलता… चक्क रात्री जागून निघायच्या…
कधी कडू कधी गोड… तर कधी नको इतकं भांडून घेतलं…
पार्किंग मध्ये बसल्या बसल्या… प्रत्येक टेन्शन सारखं वाटून घेतलं…
"रोज एकदातरी कॉल नक्की करेन…" किती सहज म्हणून गेलीस…
पण change झालेला नंबर द्यायची… तसदी सुद्धा घेतली नाहीस…
माझ्या प्रत्येक वाढदिवसाला... काही ना काही गिफ्ट दिलंस…
अन तुझ्यासाठी नेहमी माझ्याकडून काहीतरी लिहून घेतलंस…
तू दिलेलं गुलाबाचं फूल सुद्धा मी अजून मी अजून जपून ठेवलंय
कवितेलाही Inspired By म्हणून तुझंच नाव लिहिलंय
"सगळ्या आठवणी जपून ठेवेन…" किती सहज म्हणून गेलीस…
अन निघायच्या गडबडीत कवितांची ती वही माझ्याकडेच विसरलीस…
तू तिथे मी… अशीच काहीशी होती ग आपली जोडी…
कळलंच नाही कधी वाढत गेली या नात्यामधली गोडी…
तुला सोडून दुसरा कुठला… विचारच कधी केला नाही…
तुझ्याविना आयुष्य जगावं लागेल… तेव्हा कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही…
"निदान आता तरी शोध कोणी जोडीदार…" किती सहज म्हणून गेलीस…
तुला न कळलेलं माझं प्रेम… माझ्याच रिकाम्या ओंजळीत सांडून गेलीस…
सोबत जगलेले सगळे क्षण… दोघांनीही मनात जपून ठेवले…
जितके जमले तितके मीही… मुद्दाम कवितेत गोवले…
आजही आठवते मला… डोळ्यांत पाणी भरून उभी तू…
सांजवेळीच्या मंद प्रकाशात… थरथरलेल्या आवाजात निरोप घेणारी तू…
"विसरणार तर नाहीस ना मला?" किती सहज विचारून गेलीस…
आजही तसाच तू परत फिरायची वाट पाहतोय मी… अन तू मात्र माणसांच्या गर्दीत न जाणो कुठे हरवलीस…
~ Shilpa

Nice.... Memories are gift and your poem gives one more reason to rejoice them... Keep writing
ReplyDelete:)
ReplyDeleteThank you so much...
khupch chan lihites agadi sadhi sopi bhasha pan shabda gumphum chan mal tayar kartes
ReplyDelete-madhura