संशयाचा भयाण अंधार… चारी बाजूंनी वेढतो…
जीवाच्या आकांताने… मन आक्रोश करून सांगत असतं
पण जगाला त्या क्षणी… काहीच ऐकायचं नसतं…
बोलणार्याचा प्रत्येक… शब्द नको इतका बोचतो
उघड्या पडलेल्या जखमेला… पुन्हा पुन्हा उकरून जातो…
बघणाऱ्याची नजर… नुसताच संशय घेत राहते…
तोच नको असलेला प्रश्न… दर वेळी विचारून जाते
भीती वाटते देवाला हात जोडताना… नेहमीसारखं त्याला कळलच नाही तर..!!
मी घातलेलं साकड… त्याने यावेळीही ऐकलंच नाही तर…!!
तुम्ही नसतच काही केललं… तरीही मनात हजार प्रश्न उठतात…
स्वतःवरच संशय घेत… त्याचाच पाठपुरावा करतात
सगळे वार झेलायला लढायला… कणा ताठ उभा असतो…
तरीही संशयाचा एक किडा… आतून अखंड पोखरत असतो…
का असं होत…? आपण इतके हतबल का बर होतो?
या जगाला तोंड देताना… अगदीच निर्बल का होऊन बसतो?
अशाच वेळी हवा असतो… एक सावरणारा हात…
तुमच्यावर विश्वास ठेऊन… तुम्हाला बळ देणारा हात…
तो हात हातात असता… प्रत्येक प्रश्न नक्कीच सुटेल…
संशयाचा घोर अंधार… अगदी क्षणार्धात मिटेल…
सगळ वादळ शमल्यावर… विजयाचा एक किरण आकाश फाटून येईल…
अन त्याच्या कुशीत शिरून… तुम्हाला मनमोकळ समाधानाने रडता येईल…
:) तोवर बेस्ट ऑफ लक
- शिल्पा


U have opened variety of mindsets for a single situation in one single poem :)
ReplyDeleteThanks for the above comment my friend... :)